Welcome to our online store

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Etiam id libero non erat fermentum varius eget at elit. Suspendisse vel mattis diam. Ut sed dui in lectus hendrerit interdum nec ac neque. Praesent a metus eget augue lacinia accumsan ullamcorper sit amet tellus. Duis cursus egestas hendrerit. Fusce luctus risus id elit malesuada ac sagittis magna tempus. Sed egestas fringilla turpis at ullamcorper. Pellentesque adipiscing ornare cursus.
New Products

Sunday, October 2, 2011

२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार

२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार
२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार
स्रोत: तरुण भारत
ठाणे, १ ऑक्टोबर - २ जी स्पेक्ट्रम परवाना वाटप घोटाळ्याचा जो वाद सध्या सुरू आहे त्यातील तथ्ये समोर मांडण्यासाठी केंद्र सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून या मुद्याचा कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील संपुआ सरकारच्या स्थैर्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. खरे तर २ जी स्पेक्ट्रम प्रकरण वाजवीपेक्षा फुगवून दाखविण्यात येत असून यातील सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी प्रत्येकालाच त्यातील खरेपणा समजून येईल, असे पवार पुढे म्हणाले. हे प्रकरण लवकरात लवकर संपविण्यासाठी कॉंगे्रस पक्ष योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. केंद्रातील संपुआ सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार येथे आले असता काल रात्री ते पत्रकारांशी बोलत होते. २ जी स्पेक्ट्रमवरून पी चिदम्बरम व प्रणव मुखर्जी यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण प्रसिध्दी माध्यमांनी वाजविपेक्षा फुगविले आहे.
Add to Cart View detail

दहशतवादविरोधी लढ्यात पाकचे उपाय प्रभावी नाहीत : ओबामा

दहशतवादविरोधी लढ्यात पाकचे उपाय प्रभावी नाहीत : ओबामा
स्रोत: तरुण भारत
वॉशिंग्टन, २ ऑक्टोबर - पाकिस्तानला आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात सहकारी मानून त्यांना यासंदर्भातील कारवाईची जबाबदारी सोपविली. पण, त्यांनी आजवर केलेले उपाय यादृष्टीने फारसे प्रभावी सिद्ध झालेले नाहीत, अशी माहिती अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अमेरिकी कॉंग्रेसला दिली. याद्वारे त्यांनी पाकचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आणला आहे. ओबामांच्या वतीने कॉंग्रेसला एक अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे की, २०१० मध्ये आलेल्या पुरानंतर चार महिने उलटले, पण आता पुन्हा दहशतवाद डोके वर काढताना दिसतो आहे. पाकिस्तानी सैन्याला दहशतवादाला चिरडणे शक्य झालेले नाही. एवढेच नाही, तर त्यांना अतिरेकी ठिकाणांपर्यंतही पोहोचता आलेले नाही. उलट, पाकच्या या अपयशामुळे तेथे अतिरेक्यांना सुरक्षित स्थान प्राप्त झाले आहे आणि तेथील सैन्याची स्थिती दिवसेंदिवस खालावतच आहे, असेही ओबामा म्हणाले. २५ पानांच्या या अहवालात यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यानच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. पाकसोबतचे संबंध ताणले ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानसोबतचे आपले संबंध ताणले गेल्याची कबुलीही ओबामांनी या अहवालाद्वारे दिली आहे.
Add to Cart View detail

अफगाणिस्तानविषयी भारत केंद्रीत शांती चर्चा मान्य नाही : मुशर्रफ

अफगाणिस्तानविषयी भारत केंद्रीत शांती चर्चा मान्य नाही : मुशर्रफ

स्रोत: तरुण भारत
इस्लामाबाद, २ ऑक्टोबर - अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या प्रक्रियेत पाकिस्तानकडे दुर्लक्ष करत भारताला महत्त्व देण्यात येत आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केला असून, ही बाब इस्लामाबाद कदापि मान्य करणार नाही हे अमेरिकेने समजून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेतून भारताच्या बाजूने झुकणारा कुठलाही निर्णय पाकिस्तान कधीही मान्य करणार नाही, असे सध्या लंडन येथे राजकीय विजनवासात राहात असलेल्या मुशर्रफ यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानने शक्य त्या सर्व आंतरिक आणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्याची गरज आहे, असे ६८ वर्षीय मुशर्रफ यांनी एक्सप्रेस २४ बाय ७ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या बाबतीत अमेरिका आणि पाकिस्तान हे दोघेही एकाच बाजूला असणे आवश्यक आहे. असे न होता अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम राहिल्यास १९९० च्या काळात तत्कालिन सोव्हिएट युनियनची जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पाकची आयएसआय ही गुप्तचर संस्था अफगाणिस्तानमध्ये गनिमी युद्ध करत असल्याच्या अमेरिकेने नुकत्याच केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असता मुशर्रफ म्हणाले की अमेरिका आपले अपयश लपविण्यासाठी पाकिस्तानला बळीचा बकरा बनवत आहे. हक्कानी गटाचा सफाया करणे ही अमेरिका आणि पाकिस्तानची संयुक्त जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
Add to Cart View detail

हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही

हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही

स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर - लग्नसमारंभात मांडव आणि शामियाना उभारणारे आणि अन्य सेवा देणारे आता करापासून स्वत:ला वाचवू शकणार नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने, हिंदू विवाह समारंभ हे धार्मिक आयोजन नसल्याचे सांगून यावेळी मांडव आणि अन्य सेवा देणार्‍यांना सेवाकरातून सूट दिली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्र आणि न्या. संजीव खन्ना यांच्या न्यायासनाने ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायजेशनची याचिका फेटाळून लावीत हा निकाल दिला. या ऑर्गनायजेशनने म्हटले होते की, लग्नसमारंभ हे धार्मिक आयोजन असल्याने यासाठी मांडव घालण्यासंदर्भात आपल्यावर सेवाकर लादला जाऊ नये. केवळ सेवाकर लावण्यासाठी याला सामाजिक कार्यक्रम म्हटले जाऊ शकत नाही.
न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि मांडव घालणार्‍यांना सेवाकरातून मुक्तता नाही, हेही स्पष्ट केले.
Add to Cart View detail

नेपाळचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर

नेपाळचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर

स्रोत: तरुण भारत
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान बाबुराम भट्टराय या महिन्याअखेर भारत दौर्‍यावर येणार आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांनी नेपाळची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे. २१ ऑक्टोबरपासून ते भारतात येण्याची शक्यता आहे. चार-पाच दिवस ते भारतात राहतील.
Add to Cart View detail

तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेची आवश्यकता : आझाद

तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेची आवश्यकता : आझाद
स्रोत: तरुण भारत
हैदराबाद, २ ऑक्टोबर
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीच्या मुद्यावरून सध्या आंध्रप्रदेशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्रसरकारला जाणीव आहे. मात्र, तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आंध्रप्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. कुठलीही कालमर्यादा निश्‍चित न करता या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, असे आझाद यांनी विजयावाडा आणि प्रकाशम जिल्ह्याच्या दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंध्रप्रदेश सरकारमधील स्वतंत्र तेलंगणा समर्थक कर्मचारी गेल्या १३ सप्टेंबरपासून संपावर आहेत. या कर्मचार्‍यांनी जनतेचे हित डोळ्यापुढे ठेवून ताबडतोब कामावर हजर व्हावे, असे आवाहन आझाद यांनी केले. आझाद, प्रणव मुखर्जी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची शनिवारी दिल्लीत बैठक झाली होती.
Add to Cart View detail

सरकारची आत्महत्येकडे वाटचाल

सरकारची आत्महत्येकडे वाटचाल
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणी यांचा दावा
लोकसभेच्या मध्यावधीसाठी सज्ज राहण्याचे पक्षजनांना आवाहन


नवी दिल्ली, १ ऑक्टोबर
अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये आणि अंतर्गत कलहात अडकलेल्या केंद्रातील संपुआ सरकारची आत्महत्येकडे वाटचाल सुरू झालेली आहे. हे सरकार केव्हापर्यंत टिकेल, २०१४ पर्यंतचा कालावधी पूर्ण करेल काय, हे सांगता येणे कठीणच आहे. या सरकारचे भवितव्य अधांतरी असल्याने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असून, पक्षाजनांनी मध्यावधीसाठी आतापासूनच स्वत:ला सज्ज ठेवायला हवे, असे भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना अडवाणी बोलत होते. केंद्रातील संपुआ सरकारने स्वत:च आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अशी स्थिती आजवर कधीच कोणत्याही सरकारवर आलेली नाही. हे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. एक क्षणही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार या सरकारला नाही. नजिकच्या भविष्यात या सरकारचे काय होईल, याची कुठलीच हमी नसल्याने आपण निवडणुकीसाठी सज्ज राहायलाच हवे, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले. घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या मंत्र्यांना वाचविण्याशिवाय दुसरे कोणतेही काम या सरकारकडे राहिले नाही. हे सरकार पूर्णपणे निष्क्रिय झाले असून, देशभरातील नागरिक सरकारला कंटाळले आहे, असे अडवाणी म्हणाले. येत्या ११ ऑक्टोबरपासूनच्या आपल्या रथयात्रेचा उद्देश निवडणुका नसून, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती निर्माण करणे हाच एकमेव उद्देश आहे. या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला आहे. हा विश्‍वास गमविण्यासाठी सरकारचे कर्मच कारणीभूत ठरले आहेत, असेही अडवाणही यांनी स्पष्ट केले. यावेळी संपुआ सरकारवर सडकून टीका करताना विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशभरातील जनता मोठ्या आशेने भाजपाकडे पाहात आहे आणि भाजपानेही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करायला हवे. केवळ संपुआ सरकारमधील अस्थिरतेचा फायदा घेऊन निवडणुका जिंकता येणार नाही.तर, पक्षजनांनी तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करण्याची आणि त्यांचा विश्‍वास जिंकण्याची आवश्यकता आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, हे सरकार २०१४ पर्यंत टिकण्याची कुठलीही शक्यता नाही. वरिष्ठ मंत्र्यांमध्येच मतभेद निर्माण झाले आहे. एक मंत्री दुसर्‍याची हेरगिरी करीत आहे. अंतर्गत कलह इतका वाढला आहे की, सरकार केव्हा कोसळेल हे सांगणे फारच कठीण आहे.
Add to Cart View detail
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger