Monday, October 3, 2011

पुनर्जन्माला कारण वासना

पुनर्जन्माला कारण वासना
नादवंश
प्राचिन काळी शिष्याला नि:स्वार्थ भावनेने शिक्षण दिल्या जात होते. नदी किंवा झाड ज्याप्रमाणे अपेक्षा‍रहित दान करते त्याप्रमाणे गुरूकुलात विद्यार्थ्याला विद्यादान व अन्नदान गुरू निरपेक्ष बुद्धीनेच देत असत. अशा आदर्श गुरूकडून विद्या प्राप्त केलेला शिष्य गुरूचे ऋण फेडण्याच्या भावनेनेच गरूला गुरूदक्षिणा देत असे.
श्रीकृष्णाने नाहीका गुरूकडून विद्या घेतली व अत्यंत नम्रतेने गुरूला दक्षिणा देण्याची इच्छा प्रगट केली, सांदिपनी गुरूनीही निस्पृहतेने म्हटले की ''माझ्या सारखा तू ही नि:स्पृहतेने विद्यादान कर व विद्येचा प्रसार कर'' जगात दोन वंश चालतात पुत्रपरंपरेचा बिंदुवंश आणि शिष्यपरंपरेचा नादवंश श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आणि आपल्या महाप्रयाणाच्या वेळी उद्धवाला उत्तम उपदेश दिला व आपल्या गुरूचा नादवंश वा‍ढविण्याची खरीखरी गुरूदक्षिणा दिली.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
मनच ममता आणि अहंकार निर्माण करते.
Add to Cart

Related Product :

0 comments:

Post a Comment

Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger